गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व आलापल्ली परिसरात मंगळवारी संध्याकाळी अचानक हवामानात बदल होत जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट यांचा समावेश होता.
वादळामुळे अनेक घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागांत झाडे उन्मळून पडल्याने रस्ते अडले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र संपत्तीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.




