घुग्घुस (चंद्रपुर) : अनेक वर्षा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी अस्मिते बद्दल लडा देत आहे आणि महारष्ट्रात मराठी पाट्या चा मुद्दावर सुप्रीम कोर्ट नी निर्णय दिला आहे कि मराठी पाट्या लावण्यात यावी. हा मराठी अस्मितेचा संघर्षाला यश मिळाले. सुप्रीम कोर्टच्या निर्णया प्रमाणे येत्या दोन महिन्यात प्रत्येक छोटया मोठ्या दुकानावर “मराठी पाट्या मोठ्या अक्षरात लावण्यात यावी हि विनंती नगर परिषद कार्यालयाचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार आणी घुग्घुस पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांना केली आहे.
आपणास निवेदनाद्वारे दिलेला विषय मराठी अस्मिते बद्दल खूप म्हत्वाचे असून आपण या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन हे अमल बजावणी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना घुग्घुस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसान याची सर्व जवाबदारी प्रशासनची राहील.
यावेळी सुमित कोहळे (मनसे शहर उपाध्यक्ष घुग्घुस), करण विलास टेकाम (सर्कल अध्यक्ष घुग्घुस), महेश कुचणकर (शिंदोला विभागीय अध्यक्ष), निखिल बोबडे, चेतन धांडे, सुयोग देरकर, रोशन जांभूळे, आकाश सोनटक्के, शुभम मोंदळकर, सुरज कोडापे, वैभव पिदूरकर, किशोर पाचरे, अक्षय गाडगे, निखिल गुरनुले, प्रणय उपस्थित होते.