Welcome to Jan Kalyan Yatra in Nagpur
नागपूर : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित जनकल्याण यात्रा नागपूर जिल्ह्यात पोहोचली असून, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आणि तहसिलदार शितल घावटे यांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यभर सुरु असलेल्या या जनकल्याण यात्रेचे उद्घाटन नाशिकच्या दिंडोरी येथे विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरणार असून, मोबाईल एलईडी व्हॅनच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
या यात्रेदरम्यान नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळणार असून, 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमुळे अनेक गरजू लोकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.