बुलडाणा : गिरडा(1) बीट राखीव जंगल क्षेत्रात आग लावताना दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन. ठाकरे यांनी दिली.
अटक केलेल्या आरोपीं वय 60, रा. पळनये नाईक, बुलडाणा आणि वय 32, रा. हनवतखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा अशी आहेत. दोघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26 (1) (बी,सी,डी,ई), 52, 61अ, 65अ तसेच सार्वजनिक हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 अंतर्गत कलम 4 अन्वये गुन्हा (क्रमांक-15839/01) दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाने दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, बुलडाणा येथे हजर केले असता, एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
वन विभागाची तत्पर कारवाई
ही कारवाई विभागीय वन अधिकारी दक्षता तथा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, उपवनसंरक्षक सरोज गवस, तसेच सहाय्यक वनसंरक्षक आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन.ठाकरे, वनरक्षक प्रदीप प्रकाश मुंढे, व्ही.जी.राऊत, बी.ए.घुले, तसेच वाहन चालक संदीप मडावी, रविंद्र तायडे, दीपक सोनुने, अरुण पंडित, अमोल चव्हाण, जितेंद्र सोनुने यांचा सहभाग होता. प्रकरणाचा पुढील तपास वनपाल एस.डी.वानखडे करत आहेत.
वन विभागाचे नागरिकांना आवाहन
वनविभागाने नागरिकांना जंगलात आग लावू नये, तसेच पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही कृतीपासून परावृत्त राहावे, असे आवाहन केले आहे. जंगलाची हानी करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.