वाढदिवसानिमित्त बेलोरा-नायगाव खाणीत वृक्षारोपण.
घुग्घुस (चंद्रपुर) : कोणत्याही अपेक्षा न करता वृक्ष हे मानवाला आक्सीजनरुपी मदत करुन त्यांचे जिवन सुसह्य करतात, मात्र मानव हा कृतन्घ होऊन त्यावर घाव घालतो. पर्यावरणाचे महत्व ओळखून मानवाने जास्तीतजास्त वृक्ष लाऊन त्याचे संगोपण केले पाहिजे असे मत बेलोरा-नायगाव खाणीचे सर्वे अधिकारी राजेशकुमार राय यांनी व्यक्त केले. राय यांचा वाढदिवस खाणीतील ऊद्यानात वृक्षारोपण करुन करून साजरा करण्यात आला यानिमित्ताने ते बोलत होते.
यावेळी मनोजकुमार, सुनील बिपटे, प्रकाश जेऊरकर, ज्ञानेश्वर लेडांगे, विशाल क्षिरसागर, प्रज्वल नागपुरे, संजय बोंडे, दिलीप वाढयी, कलावती राडे आदिंची ऊपस्थिती होती. यावेळीकिर्यालय परीसरात गुलाब, ख्रिसमस ट्री, जास्वंद, शेवंती, लिंबू, अमृत आदी फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.