चंद्रपुर : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे समर्थ व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. या योजनेअंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे, स्पर्धांचे आयोजन होत असते. त्यातलीच एक महत्त्वाची राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे उत्कर्ष. उत्कर्ष २०२३-२४ राज्यस्तरीय सामाजिक, सांस्कृतिक स्पर्धा दिनांक १७ मार्च ते २० मार्च २०२४ या कालावधीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयातील प्रेम जरपोतवार, सुमित काकडे, वैष्णवी राजगडकर व नीलिमा कारमेंगे यांची निवड झाली. या चारही स्वयंसेवकांचा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा कायमच उत्कृष्ट राहिलेला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयश्री कापसे, कार्यक्रम अधिकारी प्रा.किरणकुमार मनुरे व प्रा.डॉ ममता ठाकुरवार, प्रा.संतोष आडे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.