घुग्घुस (चंद्रपुर) : सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्ता हा धारीवाल कंपनीच्या पाणी व हास त्यांकमुळे रस्ता बंद असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे उपयुक्त साधन सामुग्री नेण्याकरिता व शेतिकरण्या करीता रस्ता पूर्ण पने बंद झालेला असून ही समस्या गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून ह्यास त्यांक जागोजागी लिक असल्यामुळे छोटे छोटे गड्डे तयार झाले असून त्या दूषित पाण्यामुळे गुरेढोर बिमार होऊन मरण पावत आहेत तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अत्यंत उपयुक्त असलेला रस्ता व मधात छोटा पुल सुधा तयार करून द्यावे अशी सोनेगावातील शेतकऱ्यांची मागणी असून गावातील असलेला नाला हा ह्यासच्या गळतीमुळे बुजल्या गेला असून नाल्याचे खोलीकरण सुधा करून द्यावे व गावातील युवकांना अजून 15 वर्षापासून कंपनीत रोजगार कोणालाही मिळाला नसून लवकरात लवकर स्थानिक युवकांना रोजगार सुधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी संघणेच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास गावातील शेतकऱ्यांचा व बेरोजगार युवकांचा जन आक्रोश मोर्चा घेऊन कंपनी वरती तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शेतकऱ्यांचा उपयुक्त रस्ता व स्थानिक युवकांना रोजगार द्यावा अन्यथा आंदोलन करू जिल्हाध्यक्ष : सुर्या अडबाले डॉ. स्वप्नील बांदूरकर शेतकरी संघटना
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




