शरद मल्हारी पाईकराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, घुग्घुस
घुग्घुस (चंद्रपूर) : गेल्या अनेक वर्षां पासून अनेक ठिकाणी सरकारी शाळेतील मुलांच्या शिक्षणात सक्ती नसल्यामुळे प्राथमिक शाळेचे व शाळेतील विद्याथ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. शाळेतील शिक्षण बरोबर प्रकाराचे नसल्यामुळे त्यांचे भविष्य हळु हळू अंधकाराकडे जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी सरकारी शाळेचे अस्तित्व सुद्धा संपत चालले आहे. आजच्या युगात शिक्षण हे व्यापारच झाला आहे. जो व्यक्ति ज्या ऐपती चा आहे तो आपल्या मुलांना त्याच ऐपतीप्रमाणे उच्च व खाजगी शाळेत शिकवितो. त्याच प्रमाणे त्यांची मूले शिक्षित होत असतात. पण एक छोटी व खुप महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना समान व उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे. मग तो कुठल्याही भागाचा व कसल्याही परिस्थितला असो. जर सरकारी शाळेत सरकार आपल्याला मोफत शिक्षण देत आहेत. व शिक्षणासाठी सर्व सोयी उपलब्द करुण देत आहे. तरी खाजगी शाळेतील शिक्षणाच्या पटीने सरकारी शाळेतील शिक्षण कमजोर का? यांच्यावर चर्चा करने व याचा मार्ग काढने खुप गरजेचे आहे. सरकारी शाळेतील शिक्षण योग्य रीतिने मिळत नसल्याने पालाकांना आपल्या मुलाला खाजगी शाळेत शिकवावे लागत आहे. खाजगी शालेय शिक्षण उच्च व सक्तीचे तर आहे पण शालेय फी सुद्धा त्याच प्रमाने आकरली जात आहे . शालेय फी खुप जास्त असल्यामुळे तिथल्या शिक्षणाचा लाभ अनेक मूल आर्थिक परिस्थिति मुळे घेऊ शकत नाही. म्हणून अनेक मुलांना सरकारी शाळेत शिकाव लागते. सरकारी शाळेत शिकने चुकीच नाही. पण तिथे शिक्षणात सक्ती नसल्यामुळे व शिक्षणासाठी कठोर नियम नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणात खुप कमतर्ता दिसून येत आहे. व सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या देखिल दिवसेन – दिवस कमी होत चालली आहे. जर असेच चालू असल्यास सरकारी शाळेचे अस्तित्व हळू – हळू संपन्याच्या मार्गी लागेल.
सरकारी शाळेतील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय विधार्थांच्या पालकांना त्यांची जबाबदारी कळवुन सतत त्यांची सभा घेणे व कठोर नियम लागु करण्यात यावे. तसेच इंग्रजी शिक्षणात जोर देने व इंग्रजी शिक्षणात मुलांना मजबूत करण्यासाठी उच्च लक्ष देण्यात यावे. जेनेकरुन मुलांच्या शिक्षणात त्यांना योग्य प्रतिसाथ मिळेल. त्यांच्या शिक्षणात प्रगती दिसेल आणि खाजगी शालेय विद्यार्थांच्या व सरकारी शालेय विद्यार्थांच्या शिक्षणात समानता व स्थिरता दिसेल. यावर विशेष लक्ष देऊन विचार करावा. वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून कुशाल मेश्राम महारष्ट्र सदस्य, प्राध्यापक सोमाजी गोंडणे, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अँड.अक्षय लोहकरे, जिल्हामहासाचिव धर्मेंद्र शेंडे, तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वंचीत बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांच्या नेतृत्वामधे शिक्षण अधिकारी, जिल्हा चंद्रपुर. जिल्हाधिकारी, चंद्रपूर. यांना निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी घुग्घुस चा माध्यमातून मागणी करण्यात आली.
यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड.अक्षय लोकरे, वंचित बहुजन आघडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख विशाल भगत, नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर, सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.