देऊळगाव राजा : शहरातील अहिंसा मार्गावरील शहरात असलेल्या छोट्या व्यावसायिकाच्या घराला दिनांक 31 च्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये घरामध्ये असलेले संसार उपयोगी साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 60 हजाराचा मुद्देमाल जळून खाक झाला. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे काही वेळेमध्ये आग नियंत्रणात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अहिंसा मार्गावरील चौंडेश्वरी मंदिराजवळ कांतीलाल माणिकराव सुपारकर यांचे जुने निवासस्थान आहे सुपारकर हे गेल्या 25 ते 30 वर्षापासून शहरातील संतोष चित्र मंदिराजवळ भेळपुरी ची हात गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करतात. घटनास्थळी यांचे जुने निवासस्थान आहे. ते कुटुंबासह बाजूलाच असलेल्या पोस्ट ऑफिस च्या पाठीमागे राहतात जे घर जळून खाक झाले. त्या घरामध्ये ते दैनंदिन सायंकाळी संबंधित भेळपुरी च्या गाडीवर लागणारे साहित्य या ठिकाणी बनवून ठेवतात सुपार कर आणि त्यांचे कुटुंब भेळपुरीच्या गाडीवर लागणारे खाद्यपदार्थ बनवून पोस्ट ऑफिस शेजारी असलेल्या निवासस्थानी गेले त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घराला आग लागल्याची बातमी कळताच स्थानिकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला याची माहिती दिली. यावर मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी तात्काळ दखल घेत अग्निशामन दलाचे प्रमुख भगवान मापारी आणित्यांचे सहकारी घटनास्थळावर जाऊन अग्निशमन गाडीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले होते.
घरामध्ये असलेले खाद्यपदार्थ बनविण्याची साहित्य त्यामध्ये तेलाचे पाच डबे वाटाणे तीन पोते मैदा विविध कट्टे आणि घरामध्ये असलेले इतर साहित्य घरावरील 40 ते 45 टी न पत्रे रोख रक्कम एक लाख रुपये असा एकूण तीन लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाला जळून खाक झाला.
गॅस सिलेंडरचा स्फोट ने हादरले स्थानिक रहिवासी, घरामध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लागलेल्या आगीमध्ये जर घरामध्ये असलेले गॅस सिलेंडरचा स्फोट एवढा भयानक होता की साडे अकरा ते पावणे बारा दरम्यान बहुतांशी नागरिक आपल्या घरामध्ये असताना झालेल्या आवाजाने घराबाहेर येऊन घटनास्थळाकडे धाव घेतली आधीचे उग्ररूप असल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसरत करावी लागली, दरम्यान सुपारकर यांच्या घराशेजारी राहणारे जितेंद्र गोविंदराव मतकर यांच्या घराला सुद्धा या आगीची झळ पोहचली, मध्ये त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य एकूण किंमत तीस हजार रुपयाची नुकसान झाले.
शहराचे तलाठी राजू तागवाले यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि आपला अहवाल सादर केला. शासनाचे त्वरित मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.