यांनी जिल्हाधिकारीचे मानले आभार
चंद्रपूर : दिनांक 15 जुलै 2024 रोजी जागतिक युवा कौशल्य दिना निमित्ताने सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव. जिल्हाधिकारी, जिल्हा चंद्रपूर यांना मागणी केली असता. चंद्रपूर जिल्ह्य़ातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती यांना रोजगार मिळत नसल्याने त्यांचा दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत आणण्यासाठी व रोजगार नसल्याने त्यांना होणारा मानसिक त्रास, मुलभूत गर्जा कशा पद्धतीने पार पाळावयाचा हि बाब विचारात घेता.
चंद्रपूर जिल्हातील युवक व युवती जे सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार मिळेपर्यंत महिन्याला त्यांची आवश्यक मुलभूत जीवन खर्च भागविण्यासाठी भत्ता देण्यात यावा. सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी मिळणारा बेरोजगारी भत्ता सरकारने बंद केलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासन दरबारी मागणी करावी. सुशिक्षित बेरोजगारांना महिण्याला त्यांचे शिक्षण पाहुन भत्ता उपलब्ध करून द्यावा.
भत्ता खालील प्रमाणे देण्यात यावा :
बारावी उत्तीर्ण – 6,000/-रुपये
आय.टि.आय/ पदविका – 8,000/-रुपये
पदवीधर/ पदव्युत्तर – 10,000/-रुपये
हा भत्ता त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा किंवा रोजगार मिळेपर्यंत वयाचा 40 वर्षापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून भत्ता देण्यात यावा. हि बाब दिनांक 15 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या लक्षात आणून दिली.
सफेद झंडा कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष – सुरेश मल्हारी पाईकराव यांनी जिल्हाधिकारीचे व चंद्रपूर जिल्हय़ातील, घुग्घुस येथील पत्रकारांचे खुप खुप धन्यवाद मानले. व चंद्रपूर जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगारांना आव्हान सुध्दा केले. कि या योजनेचा सुशिक्षित बेरोजगार भरपूर लाभ घ्यावा.
काय आहे योजना :
जिल्हयातील युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठया संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
येथे करा संपर्क :
या करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उमेदवारांनी व आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेणे व कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना फक्त एकच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, चंद्रपूर येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.