पुणे : विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ट्विटनुसार सरकारने कंत्राटीकरण भरती करू नये, याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा. भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी परीक्षा स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी ह्या दोन मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींनी आज पुणे येथे आंदोलन केले. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करावा.
स्वतःचे आर्थिक हित आणि भाजप नेत्यांच्या कंपन्यांना आर्थिक फायदा कसा होईल हे पाहण्यापेक्षा राज्यातील तरुणांना पदभरतीत आरक्षण आणि योग्य संधी कशी मिळेल याचा विचार सरकारने करावा.